शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांची जबाबदारी वर्षभर ठेकेदारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:07 IST

सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर याचा ताण येणार नाही.विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात ...

सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर याचा ताण येणार नाही.विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. रस्ते करण्याची प्रचलित पद्धत कायम आहे. अनेकदा पाऊस पडला की रस्ता खराब होतो, हे नेहमीचे गणित आहे. यंदा तर पावसाने हद्दच केल्याने जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती होती. रस्त्यांची चाळण झाल्याने सर्वच माध्यमांतून सरकारवर टीका होऊ लागली.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खराब झालेल्या ९२८ किलोमीटर अंतरातील राज्यमार्ग व १ हजार ५०० किलो मीटर अंतरातील प्रमुख जिल्हा मार्गांचे काम बांधकाम विभागाने टार्गेट ठेवले. मध्यंतरीच्या काळात राज्याच्या धर्तीवर एकच डीएसआरचा निर्णय आणि त्यानंतर अंमलात आलेली जीएसटी करप्रणाली याला विरोध करत बांधकाम ठेकेदारांनी कामांवर बहिष्कार टाकला होता. कुठल्याही शासकीय कामाचे टेंडर भरायचे नाही, असे धोरण ठरवून ठेकेदारांनी काम बंद ठेवले, याचा परिणाम म्हणून पावसाळ्याआधी टेंडर प्रक्रिया झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यावरील खड्डेही मुजविले गेले नाहीत.नोव्हेंबर महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मंत्रालय आणि प्रत्येक जिल्ह्याच्या बांधकाम विभागातील वॉररूमही तयार करण्यात आली. दीड महिन्यात तब्बल २ हजार ४२८ किलोमीटर अंतरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवायचे काम सुरू करण्यात आले.पूर्ण झालेल्या कामाचे रिपोर्ट रोजच्या रोज बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सायंकाळी पाच वाजता मिळत होते. ते मंत्रालयात पाठविले जाऊ लागले आहेत. ठेकेदारांचे ८५ युनिट जिल्हाभर कार्यरत आहेत. एका कामावर २० कामगार असे एकूण १ हजार ७०० कामगार राबत आहेत.हे काम वेगाने करायचे असले तरी संबंधित ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराला वेगळे पैसे मिळणार नाहीत.दिलेल्या रकमेतच दुरुस्तीचेकाम करावे लागणार आहे. त्यांनातशी अटही घातली गेली असल्याने सुदैवाने रस्त्यांवर लगेच खड्डेपडतील, ही शक्यता सध्या तरी दिसत नाही.मोबाईल युनिट वर्षभर राहणार सज्जरस्त्यावर खड्डा पडल्यानंतर लोकांनी आवाज उठविण्याची वाट पाहायची गरज नाही. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांच्या ठिकाणी मोबाईल युनिट सर्व्हे करण्यासाठी पाठवायचे आहे. भरलेला खड्डा पुन्हा खराब झाला असल्यास तो भरण्याचे काम तत्काळ हाती घ्यायचे आहे.ओखीच्या संकटामुळेमोठा गतिरोधकदोन दिवसांपासून ओखी वादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. पाऊस आणि डांबराचे वैर असते, साहजिकच पावसामुळे रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा गतिरोधक उभा राहिला आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग