शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

खड्ड्यांची जबाबदारी वर्षभर ठेकेदारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:07 IST

सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर याचा ताण येणार नाही.विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात ...

सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर याचा ताण येणार नाही.विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. रस्ते करण्याची प्रचलित पद्धत कायम आहे. अनेकदा पाऊस पडला की रस्ता खराब होतो, हे नेहमीचे गणित आहे. यंदा तर पावसाने हद्दच केल्याने जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती होती. रस्त्यांची चाळण झाल्याने सर्वच माध्यमांतून सरकारवर टीका होऊ लागली.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खराब झालेल्या ९२८ किलोमीटर अंतरातील राज्यमार्ग व १ हजार ५०० किलो मीटर अंतरातील प्रमुख जिल्हा मार्गांचे काम बांधकाम विभागाने टार्गेट ठेवले. मध्यंतरीच्या काळात राज्याच्या धर्तीवर एकच डीएसआरचा निर्णय आणि त्यानंतर अंमलात आलेली जीएसटी करप्रणाली याला विरोध करत बांधकाम ठेकेदारांनी कामांवर बहिष्कार टाकला होता. कुठल्याही शासकीय कामाचे टेंडर भरायचे नाही, असे धोरण ठरवून ठेकेदारांनी काम बंद ठेवले, याचा परिणाम म्हणून पावसाळ्याआधी टेंडर प्रक्रिया झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यावरील खड्डेही मुजविले गेले नाहीत.नोव्हेंबर महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मंत्रालय आणि प्रत्येक जिल्ह्याच्या बांधकाम विभागातील वॉररूमही तयार करण्यात आली. दीड महिन्यात तब्बल २ हजार ४२८ किलोमीटर अंतरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवायचे काम सुरू करण्यात आले.पूर्ण झालेल्या कामाचे रिपोर्ट रोजच्या रोज बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सायंकाळी पाच वाजता मिळत होते. ते मंत्रालयात पाठविले जाऊ लागले आहेत. ठेकेदारांचे ८५ युनिट जिल्हाभर कार्यरत आहेत. एका कामावर २० कामगार असे एकूण १ हजार ७०० कामगार राबत आहेत.हे काम वेगाने करायचे असले तरी संबंधित ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराला वेगळे पैसे मिळणार नाहीत.दिलेल्या रकमेतच दुरुस्तीचेकाम करावे लागणार आहे. त्यांनातशी अटही घातली गेली असल्याने सुदैवाने रस्त्यांवर लगेच खड्डेपडतील, ही शक्यता सध्या तरी दिसत नाही.मोबाईल युनिट वर्षभर राहणार सज्जरस्त्यावर खड्डा पडल्यानंतर लोकांनी आवाज उठविण्याची वाट पाहायची गरज नाही. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांच्या ठिकाणी मोबाईल युनिट सर्व्हे करण्यासाठी पाठवायचे आहे. भरलेला खड्डा पुन्हा खराब झाला असल्यास तो भरण्याचे काम तत्काळ हाती घ्यायचे आहे.ओखीच्या संकटामुळेमोठा गतिरोधकदोन दिवसांपासून ओखी वादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. पाऊस आणि डांबराचे वैर असते, साहजिकच पावसामुळे रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा गतिरोधक उभा राहिला आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग